HW News Marathi
महाराष्ट्र

‘शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात’, किशोरी पेडणेकरांचे राणेंवर टीकास्त्र!

मुंबई। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने तयारीला सुरुवात केली असून सत्ताधारी शिवसेनेच्या समोर थेट नारायण राणे यांचं आव्हान भाजपने पुढे केले आहे. त्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक कठीण जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. तसेच जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. या टीकेला आता मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे.

शिवसेना कधीच कोणती निवडणूक सोपी समजत नाही

येणाऱ्या निवडणुकीत मुंबई महापालिका तुमच्या हातात राहणार नाही असे नारायण राणे म्हणाले. राणेंच्या या प्रश्नाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “शिवसेना कधीच कोणती निवडणूक सोपी समजत नाही. निवडणूक कठीणच असते आणि शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात”, असे म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.

नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले

जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले अशी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना महापौर पेडणेकर म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलण्याआधी त्यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला, मुंबईला कसं सांभाळलं आहे हे सर्वांनी पाहिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. नारायण राणेंचा राजकीय प्रवास काय आहे ते सर्वांनाच माहित आहे. अशी टीका पेडणेकर यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी पक्ष सोडला म्हणूनच थोरातांना प्रदेशाध्यक्षपद, नाहीतर त्यांचे कर्तृत्व काय ?”

News Desk

मोठी बातमी! सचिन सावंतांनी दिला काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा

News Desk

बुरा न मानो होली है… संजय राऊत यांचे सूचक ट्विट

News Desk