HW News Marathi
व्हिडीओ

कर्नाटकातील मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामील करण्याची AjitPawarयांनी Narendra Modiकडे केली मागणी!

महाराष्ट्र बेळगाव सीमावाद लवकरात लवकर संपावा, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय लागलीच थांबवून तिथली गाव महाराष्ट्रात समाविष्ट करून पुढाकार घ्यावा अशी विनंती आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली. मराठीत लिहिलेल्या पत्रात अजित पवार म्हणतात, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठहून अधिक वर्ष झाली तरीही बेळगाव निपाणी सह महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील शेकडो मराठी भाषिक अजूनही महाराष्ट्र बाहेरच आहेत महाराष्ट्रातील सीमाभागातील मराठी माणसाच्या मनात याची खंत आहे सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे मराठी भाषिकां संदर्भातील कर्नाटक सरकारची कृती अन्याय पूर्ण व मानवता विरोधी आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होणारा अन्याय तात्काळ थांबवावा आणि सीमाभागातील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली

#AjitPawar #NarendraModi #SharadPawar #Karnataka #Hwnewsmarathi #Maharashtra #Belgaum #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र सरकार आणि CBI प्रमुख सुबोध जयस्वाल यांच्यातला नेमका वाद काय?

News Desk

Prakash Aambedkar | प्रकाश आंबेडकर कॉंग्रेसच्या संपर्कात !

Arati More

राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष, नेहमी उध्दव ठाकरेच टार्गेट का ?

News Desk