HW News Marathi
महाराष्ट्र

वानखेडे कुटुंबिय आंबेडकर अनुयायी, दलित अधिकाऱ्यांवर अन्याय होतोय; आठवलेंचा वानखेडेंना पाठींबा

मुंबई। समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची वांद्रे येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि वानखेडेंच्या कुटुंबियांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली ज्यात रामदास आठवले यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबियांना पाठिंबा दर्शवत समीर वानखेडे आणि कुटुंबिय आंबेडकर अनुयायी आहेत. समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप म्हणजे एका दलित अधिकाऱ्यावर होणारा अन्याय आहे. नवाब मलिक यांच्यावर जावयावर समीर वानखेडे यांनी केलेल्या ड्रग्ज कारवाईमुळे नवाब मलिकांकडून वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात असल्याचे आठवले यांनी म्हटले.

जावयांवरील कारवाईमुळे मलिकांकडून आरोप

पुढे रामदास आठवले यांनी, ‘आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये ड्रग्ज सापडले नाहीत मग कोर्टाने २२ दिवस जामीन का दिला नाही? असा प्रश्न उपस्थित केला. नवाब मलिक वानखेडे कुटुंबियांना त्रास का देत आहेत. जावयांवरील कारवाईमुळे मलिकांकडून आरोप आणि समीर वानखेडे यांच्याविरोधात षडयंत्र केले जात आहे. पंच प्रभाकर प्रभाकर साईलला पैसे दिल्याने त्याने लाचखोरीचे गंभीर आरोप समीर वानखेडे यांच्यावर केले आहेत. आज मला क्रांती रेडकर आणि ज्ञानदेव वानखेडे भेटले त्यांनी मला सगळी कागदपत्रे दाखवली. त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या. समीर वानखेडे यांच्यावर अन्याय होता कामा नये तुम्ही आमच्या पाठिशी रहा अशी विनंती त्यांनी केली’, असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

मात्र मी कधीही धर्मांतर केल नाही

पत्रकार परिषदेत बोलताना ज्ञानदेव वानखेडे म्हणाले, ‘मी कधीही धर्मांतर केलेले नाही. १९७८मध्ये मी एका मुस्लिम महिलेशी लग्न केले. मात्र मी कधीही धर्मांतर केल नाही. माझ्या आणि माझ्या मुलाचे मागे अद्याप कोणीही उभे राहिले नाही याची मला खंत आहे. तुमच्या जावयाला माझ्या मुलाने ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याने तुम्हा हे करत आहात’,असा आरोप वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे. त्याचप्रमाणे जावयावर केलेल्या कारवाईची दाद मागण्यासाठी तुम्ही न्यायालयात जावे. आमची बदनामी करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही आणि तुम्ही हे करुही नये, अशी विनंती ज्ञानदेव वानखेडे यांनी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अ‍ॅड. जयश्री पाटलांमुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, बोलवता धनी सांगणार

News Desk

राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात

News Desk

अजित पवारांच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही! – देवेंद्र फडणवीस

Aprna