HW News Marathi
महाराष्ट्र

ड्रग्जचं व्यसन लागलेल्यांना अटक न करता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा -आठवले

दिल्ली। राज्यात सध्या ड्रग्स प्रकरण खूप चर्चेत आहे. अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान हा गेले अनेक दिवस ड्रग्स प्रकरणात आर्थर रोड कारागृहात बंद आहे. आर्यनला कोठडीतून जामीन मिळण्यासाठी त्याच्या वकिलांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ड्रग्जचं व्यसन लागलेल्यांना अटक न करता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं पाहिजे असा सल्ला दिला आहे.

ड्रग्जचं सेवन करतात त्यांना चांगल्या आरोग्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा

जे कोणी दारू पितात त्यांना तुरुंगात पाठवले जात नाही. परंतु अंमली पदार्थांचे प्रमाण कितीही असले तरी त्यांना तुरुंगात टाकले जाते ते योग्य नसून यासाठी कायद्यात बदल झाला पाहिजे. जे व्यसनी आहेत किंवा ड्रग्जचं सेवन करतात त्यांना चांगल्या आरोग्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले पाहिजे असा सल्ला आठवले यांनी दिला.

आर्यन खानवर झालेल्या कारवाईत अजिबात पक्षपातीपणा नाही

सुशांत सिंग नंतर एनसीबीने अनेक लोकांवर या संबंधी कारवाई केलेली आहे. त्या सोबतच चित्रपटसृष्टी ड्रग्स मुक्त करण्याची आवश्यकता आहे. आर्यन खानवर झालेल्या कारवाईत अजिबात पक्षपातीपणा नाही. त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय आर्यनला जामीन देत नसावे, असे आठवले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Chetan Kirdat

बदलत्या काळातील समस्यांवर मात करण्यासाठी दिव्यांगांना सक्षम करावे! – उपमुख्यमंत्री अजित पवार

News Desk

पारोळात घराचं छत कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

News Desk