HW News Marathi
महाराष्ट्र

‘निर्बंध शिथिल करण्यावर एकमत नाही’, विजय वडेट्टीवारांची माहिती

मुंबई | कोरोनाचं संकट ओसरताना दिसत आहे. सरकारने राज्यात १ ऑगस्ट पासून शिथिलतेचा निर्णय घेतला होता परंतु अद्यापही शिथिलता अमलात नाही आलेली.ऑगस्टच्या शेवटपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही. फक्त चर्चा झाली, असं सांगतानाच टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अजूनही आहे. देशातील दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही. निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. व्यापाऱ्यांच्या भावना योग्य आहेत. पण कोरोनाच्या बाबतीत ढिलाई महागात पडू शकतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकार सावध पावलं टाकत आहेत. व्यापाऱ्यांचा जीवही महत्त्वाचा आहे. व्यापाऱ्यांच्या भावनेशी सहमत राहून मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

निर्बंध कुठे असतील कायम?

राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्यासाठी विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातच शाळा भरो आंदोलन

News Desk

“अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढणार, ” संभाजीराजेंची मोठी घोषणा

Aprna

‘सामनात आमच्याबद्दल कधी चांगलं लिहिलं गेलं?’, फडणवीसांचा सवाल

News Desk