HW News Marathi
देश / विदेश

‘खाल्लेही, मित्रांना खाऊ घातलेही. फक्त जनतेला खाऊ देत नाहीत ‘, राहुल गांधींची सरकारवर टीका

नवी दिल्ली | देशात जे कृषी कायदे लागू केले गेले आहेत त्यावर शेतकरी वर्ग नाखूष असून त्यांनी या विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. अनेक मंत्र्यांनी देखील हे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. या मुद्यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी कायद्याचा विरोध करताना शेतकरी आंदोलनात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जाणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, ज्यांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले आहे त्यांच्या डोळ्यातील आश्रूंमध्ये खूप काही दिसते. त्यांनी केंद्र सरकारवरुन ट्विटरवर हल्ला चढवला आहे.

खाल्लेही, मित्रांना खाऊ घातलेही. फक्त जनतेला खाऊ देत नाहीत

राहुल गांधी हे नेहमीच सरकार विरुद्ध टीका करत असतात. शेतकऱ्यांच्या मुद्द्य सोबत त्यांनी इंधन वाढीचा मुद्दा सुद्धा मांडलं आहे. कोरोना व्हायरस महामारी नियंत्रणासाठी सरकाला कथीत स्वरुपात आलेले अपयश, आवश्यक औषधांचा काळाबाजार, इंधन दरांच्या वाढत्या किमती यांसारखे मुद्दे असतील किंवा भारत चीन सीमा वादाचा विषय. राहुल गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरत टीका केली आहे. याच आठवड्यात राहुल गांधी यांनी खाद्य तेलात दरात झालेल्या वाढीवरुन ट्विट केले होते. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘खाल्लेही, मित्रांना खाऊ घातलेही. फक्त जनतेला खाऊ देत नाहीत’.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमान प्रवासात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणास अटक

News Desk

राहुल गांधींना टीम तयार करावीच लागेल, शिवसेनेचा काँग्रेसला मोलाचा सल्ला

News Desk

छत्तीसगडमध्ये २०० गोमातांचा भूकबळी

News Desk