HW News Marathi
महाराष्ट्र

नागपुरात वारकऱ्यांचे पायी वारीसाठी भजन आंदोलन

नागपूर | महाराष्ट्रात आषाढीची वारी फार महत्वाची मानली जाते. मागच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीला परवानगी दिली गेली न्हवती, मात्र या वर्षी सुद्धा कोरोनाचं संकट कायम असल्याने पायी वारीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. दीर्घकाळापासूनची परंपरा असलेल्या पायी आषाढी वारीला परवानगी मिळावी यासाठी विरोधकांसह अनेक वारकरी संघटनांकडूनही मागणी केली जात आहे. यासाठी राज्याच्या विविध भागात या विऱोधात आंदोलनं सुरु आहेत. सरकारने आषाढी वारीसाठी निर्बंध घालून दिले असले तरी पायी वारीला मात्र यंदाच्या वर्षीही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या राज्यातल्या वारकरी संघटनांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे.

वारकऱ्यांकडून भजनं गात आंदोलन

पायी वारीसाठी परवानगी मिळावी म्हणून अनेक वेळा आंदोलनं केली गेली. नागपुरातही पायी वारीला परवानगी मिळावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेसह शहरातल्या अनेक वारकरी संघटनांनी भजन आंदोलन केलं आहे. महाराष्ट्राची शेकडो वर्षांपासूनची परंपरा असलेली आषाढी वारी सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्याच्या निषेधार्थ आणि राज्यातली मठमंदिरे उघडण्याच्या मागणीकरता हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी वारकरी एकत्र जमून भजनं गात आंदोलन करत आहेत.

दहा पालख्यांना मान्यता

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीची परंपरा जपण्यासाठी यंदा मनाच्या दहा पालख्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. यासंदर्भात, राज्य शासनाच्या विरोधात दाखल याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. त्यामुळे, केवळ १० मानाच्या पालख्याच आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जातील असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला आहे.

बसमधून जाणार पालख्या

प्रत्येक पालखीला दोन बसमधून ६० वारकऱ्यांसह प्रवास करता येणार आहे. मात्र, ६० वारकऱ्यांची नवे ही त्या-त्या संस्थानने निश्चित करण्याचा निर्णय घ्यायची आहे. त्यामुळे यंदाही वारीचा सोहळा वाखरी तळापर्यंत एसटी बसनेच होणार आहे. देहू येथून जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा १ जुलै रोजी, तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा २ जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बुली बाई अॅप प्रकरणी तीन जणांना अटक; कसा लावला छडा? हेमंत नगराळेंनी दिली माहिती

Aprna

नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

News Desk

शुल्क विभागाचे धाडसत्र सुरू,१३ दिवसात १,४२९ गुन्ह्यांची नोंद

News Desk