HW News Marathi
देश / विदेश

शरद पवार दिल्लीत पोहोचले, पवार आणि राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली | लोकसभा निवडणूक आता पार पडणार असून लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत आज (१६ जुलै) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते राजनाथ सिंह यांच्याशी संरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे पवार-राजनाथ सिंह यांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या भेटीत संरक्षण विषयक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

भाजपकडून विरोधकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न

विरोधी पक्ष आणि महाविकासआघाडी यांच्यातले वाद सर्वसामान्यांना माहीतच आहेत. अधिवेशनाच्या तोंडावर भाजपकडून विरोधकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार-राजनाथ सिंह यांच्या आजच्या भेटीकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. या भेटीत इतर राजकीय विषयावरही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिवेशनात सरकारला संरक्षणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरणार

अधिवेशनात नक्की काय मुद्दे मांडले जाणार यावर आता सगळ्यांचाच लक्ष लागून आहे. लोकसभा अधिवेशनात सरकारला संरक्षणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरणार असल्याचा इशारा दिला होता. दिल्लीतील पावसाळी अधिवेशनात महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न, कोरोना, चीनच्या सीमेवर काय चाललंय या मुद्द्यांवर चर्चा होणार, असल्याचंही त्यांनी सांगितलं.

१९ जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

विधिमंडळचं पावसाळी अधिवेशन पार पडलं असून त्यात अनेक मुद्दे मांडले गेले. या अधिवेशनात महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षामध्ये चढाओढ दिसून आली. भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबना पासून ते भाजपचं प्रतीरूपी अधिवेशन भरवणं, या सगळ्या गोष्टींमुळे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन लक्षात राहील.

आता, संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असून, १३ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यामध्ये १९ कामकाजाचे दिवस असणार आहेत. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धवजी भाजपच्या चुकीला माफी नाही ना ? उपमुख्यमंत्र्यांचा सवाल ,मुख्यमंत्र्यांचं उत्तर !

Arati More

#Article370Abolished : पाकिस्तानचा जळफळाट, भारताविरोधात घेतले ३ मोठे निर्णय

News Desk

#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय

News Desk