HW News Marathi
देश / विदेश

१५ ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका, मोदींच्या नव्या मंत्र्यांना कोणत्या या सुचना?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पडला. यानंतर लगेच खातेवाटपही जाहीर झालं. काल (८ जुलै) नव्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नवनिर्वाचीत केंद्रीय कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची बैठक घेतली. मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मोदींनी नव्या मंत्र्यांना अनेक सूचना आणि सल्ले दिले आहेत. त्यात गरज नसताना माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळा, अनावश्यक वक्तव्ये टाळा, अशा सूचनांचा समावेश आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी या मंत्र्यांना 5 महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५ महत्वाच्या सूचना

१. १५ ऑगस्टपर्यंत नवनिर्वाचित मंत्र्यांनी दिल्ली सोडू नये.

२. महिन्याभरात म्हणजे १५ ऑगस्टपर्यंत मंत्रालयात हजर रहा.

३. मिळालेल्या मंत्रालयाचं कामकाज समजून घ्या.

४. अनावश्यक वक्तव्य नकोत.

५. जल्लोष मर्यादीत राहील याची काळजी घ्या.

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांच्यासारख्या १२ विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. या मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीमुळे काढण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. मात्र मंत्रिपदावरुन बाजूला करण्यात आलेल्या मंत्र्यांना त्यांची कामगिरी किंवा क्षमतेमुळे डच्चू देण्यात आलेला नाही. मंत्र्यांच्या राजीनाम्याचा त्यांच्या कार्यक्षमतेशी संबंध नाही. तर जुन्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना दबाबदारी देण्यात आली आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. तुम्ही ज्यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. माध्यमांना गरज नसताना प्रतिक्रिया देणं किंवा कोणतंही आक्षेपार्ह विधानं टाळा, अशी सूचनाही पंतप्रधानांनी या मंत्र्यांना केली आहे.

१५ ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका, मोदींच्या नव्या मंत्र्यांना कोणत्या या सुचना?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्यांचं भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयात! समितीने बंद लिफाफ्यात अहवाल केला सादर

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !

News Desk

“सरकारनं भींती उभारायचं काम करु नये”, राहूल गांधींचा केंद्राला खोचक सल्ला

News Desk