HW News Marathi
देश / विदेश

साताऱ्याच्या प्रवीण जाधवचं ऑलिंपिकसाठी निवड, पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

नवी दिल्ली | टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे.या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. त्यामुळे या खेळाडूंना खुल्या मनानं पाठिंबा द्या असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्याच्या प्रवीण जाधव या खेळाडूचे ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक केलं आहे. आज (२७ जून) ‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं. तसेच टोकियो ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा संघर्ष कठोर आहे असं सांगत त्यांनी ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधांनांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

साताऱ्याच्या प्रवीण जाधव या खेळाडूचा उल्लेख

पंतप्रधानानी आपल्या मन की बात या कार्यक्रमात साताऱ्याच्या प्रवीण जाधव या ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधव बद्दल ऐकले तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे.”

पंतप्रधान म्हणाले की, “टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे.या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. म्हणूनच मी देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो, की या खेळाडूंवर आपण कळत-नकळत दबाव आणायचा नाही तर खुल्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायचा आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईसह राज्याच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

News Desk

Independence Day 2020 | जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk

OBC आरक्षणासाठी भाजप आक्रमक ! राज्यभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात

News Desk