HW News Marathi
महाराष्ट्र

संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता- उद्धव ठाकरे

मुंबई।संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर टीका केली आहे.

संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळाआपट करत आहेत. पण त्याविषयी मी आता फार बोलणार नाही, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांचे कान टोचले. कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणारा आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम बाळगल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांचे आभार. न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणं हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तोच नेता होऊ शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव दंगलीबाबत नवा खुलासा

News Desk

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरणार!

News Desk

डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द ! राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन…

News Desk