HW News Marathi
महाराष्ट्र

“सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर पुतळा बसवा”, गोपीचंद पडळकरांची मागणी

मुंबई | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्याच्या नंतर आता थेट राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यामुळे राज्यपाल पडळकरांच्या पत्रावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘शस्त्र आणि शास्त्र’ या दोन्हीची शिकवण

दुष्काळी भागातल्या या विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करत युवक-युवती येतात. त्यांच्या संघर्षाला प्रेरणा देण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा करू शकतो. त्यामुळं ‘शस्त्र आणि शास्त्र’ या दोन्हीची शिकवण देणाऱ्या माँसाहेबांच्या अश्वारुढ पुतळ्यातूनच विशेषतः युवतींना प्रेरणा मिळणार आहे. माँसाहेबांचे अनेक शिवपिंडधारी पुतळे इंदौरपासून ते जेजूरी संस्थानपर्यंत आहेत. जेजूरीतही शिवपिंडधारी पुतळा बसवण्यात आला आहे. पण अन्यायाविरूद्ध लढण्याची प्रेरणा देणारा पुतळा उभारला गेला पाहिजे. याविषयी कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

‘जाईल तिथं राजकारण’

आधीच्या स्मारक समितीने अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. सर्वांनी मान्यताही दिली होती. पण ‘जाईल तिथं राजकारण’ करण्याची खोड असलेले ‘पोस्टर बॉय’ इथेही खोडा घालताहेत. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पवित्र नाव लाभलेल्या विद्यापीठाला आपण राज्याचे राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती म्हणून कुणाच्याच राजकारणाचा अड्डा होऊ देऊ नका. ही आपणास विनंती आहे. माँसाहेबांचा भव्य अश्वारूढच पुतळा उभारण्यात यावा अशा सूचना आपण विद्यापीठ प्रशासनाला द्याव्यात. ही विनंती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, ही भाषा महाराष्ट्रात चालत नाही !

swarit

‘काळजीवाहू’ सरकार फक्त ‘वर्षा’वर, सामनातून फडणवीसांवर टीका

News Desk

कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर ठाणे मनपाचा मोठा निर्णय!

News Desk