HW News Marathi
महाराष्ट्र

“तुम्ही तिघे असाल तर नक्की चर्चा करु”, संभाजीराजेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी आता मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. आजपासून (१६ जून) मूक मोर्चा सुरू केला आहे. कोल्हापुरातून याची आज सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी काल (१५ जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजीराजे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रतिक्रीया दिली. अजित पवार असं म्हणाले की, आंदोलन करण्याआधी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलायला हवं होतं. यावर आता संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जेव्हा तुम्ही तिघे एकत्र असाल तेव्हा नक्की चर्चेला येऊ!

“तुम्ही, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण एकत्र असतील तेव्हा आपण नक्कीच चर्चेला येऊ”, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती या अजित पवार यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते.

आम्ही तुम्हाला भेटून समाजाच्या मागण्या तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार काल माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, संभाजीराजेंनी आंदोलन करण्याआधी मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करायला हवी होती. मात्र आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. ते जरुर करावं फक्त करोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेऊन करावं. याला उत्तर देताना आज संभाजीराजे म्हणाले, अजितदादांचा मला फोन आला होता. मी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला भेटून समाजाच्या मागण्या तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत. त्यावर तुम्ही चर्चा करावी. आणि जेव्हा तुम्ही, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण सगळे एकत्र असाल तेव्हा मला बोलवा. मी येईन.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मूक आंदोलनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त खासदार संभाजीराजे यांनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर करोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी समाजाला सांगितलं आहे.

काल समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, यावेळी ते म्हणाले की कोल्हापुराला वैचारिक, पुरोगामी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून करत आहोत. त्याचबरोबर त्यांनी शांततेत आंदोलन पार पाडण्याचं आवाहनही केलं आहे. ते म्हणाले, आंदोलनादरम्यान कोणीही कोणत्याही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा. हे मूक आंदोलन शिस्तीत पार पाडायला हवं.

काय म्हणाले होते अजित पवार?

कोल्हापुरात होणाऱ्या मूक आंदोलनाबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, संभाजीराजे यांनी आंदोलन करण्याऐवजी त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. पण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. त्यांनी आंदोलन करावं पण करोना वाढणार नाही याची काळजी घेऊन करावं. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसंच हसन मुश्रीफ हेही सहभागी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे त्यावर ५ जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे” फडणवीसांची खोचक टीका

News Desk

राजीव सातव यांच्या निधनाने तरुण, कर्तृत्वान व उमदे नेतृत्व गमावले! – नाना पटोले

News Desk

सत्तेत येण्यासाठी आम्ही अनेक आश्वासने दिली | गडकरी

swarit