HW News Marathi
महाराष्ट्र

अजितदादांवर नव्हे ,शिवसेनेवर राग !चंद्राकांत पाटील का नरमले ?

पुणे | राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये चांगलाच शाब्दीक वाद रंगला आहे. आज (७ जून) पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी या वादावर पुन्हा भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाहीत. पण, ते जेव्हा माझ्या पक्षाबद्दल बोलतात तेव्हा त्यांना मी उत्तर देणार. अजित पवार जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलतात, आमच्या संस्थांबाबत बोलतात तेव्हा त्यांना उत्तर देणे भाग असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते भाजप बद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलले तर मी शांत बसणार नाही, असा थेट इशाराच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना यावेळी त्यांना सरकार पडले म्हणून अजित पवार यांच्यावर राग आहे का असा प्रश्ना पाटील यांना विचारला असता पाटील म्हणाले की, माझा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राग सरकार पडले म्हणून अजित पवारांवर नाही. आमचा राग शिवसेनेने दगा दिला त्यामुळे शिवसेनेवर आहे, असे पाटील म्हणाले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं होतं.

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवारांनी मराठा आरक्षणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सुनावलं आहे. अजित हेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते, तर काय म्हटले असते. आम्हीच कायदा केला होता,” अशा शब्दात पवारांनी भाजपवर निशाणा साधला होता. ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र बाहेर कसे आले, असे पाटील म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ”जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. आता कोरोनाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : पराभवानंतर पवार-शिंदेमध्ये बंद दाराआड चर्चा

News Desk

पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, भिंत कोसळून १ महिलेचा मृत्यू

News Desk

देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन, जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल ! नाना पटोलेंचा घणाघात

News Desk