HW News Marathi
महाराष्ट्र

छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- संभाजीराजे

कोल्हापूर | मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. मराठा आरक्षण मिळावं यासाठी खासदार संभाजीराजे आता अँक्शन मोडमध्ये आले आहेत. लोकांच्या, तसेच राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांच्या ते गाठी भेटी घेत आहेत. यावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. हे कसले राजे असं काल (३ जून) पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याला आता स्वतः संभाजीराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर…

छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. असे ट्विट करत राणे कुटुंबीयावर छत्रपती संभाजीराजे यांनी निशाना साधला आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे मराठा आरक्षणासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या भेटीवरून राणे कुटुंबीय त्यांच्यावर टीका करत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हे कसले राजे आहेत असा सवाल पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला होता. याला छत्रपती संभाजीराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असेही त्यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे.

 

काय म्हणाले होते नारायण राणे?

“ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलो म्हणजे आरक्षणही मिळत नाही आणि कोणी पुढारीही होत नाही. समाजाला वाटलं पाहिजे ते राजे आहेत. लोकांमध्ये आस्था, आपुलकी, प्रेम निर्माण होण्यासाठी तसं कार्य करावं लागतं. मला संभाजीराजेंचा फोन आला होता. पण आमची भेट झालेली नाही.

…म्हणून भाजपने स्वतःहून त्यांना खासदारकी दिली

“संभाजीराजेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता मी मागेही म्हटले होते की राजेंनी आता राजीनामा देऊ नये. महाराजांचे नाव लागतं त्यांच्या नावाला म्हणून भाजपने स्वतःहून त्यांना खासदारकी दिली होती. ती खासदारकी संपत असताना आता राजीनामा देऊ नये”, असा सणसणीत टोला नारायण राणे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना लगावला होता.

शरद पवारांवर टीका करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा

नारायण राणेंनी पुढे पुन्हा शरद पवारांवर टीका करताना शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले कि, “शरद पवारांनी तर ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. तरीही पवारांनी मराठा समाजासाठी काहीही केले नाही. म्हणजे त्यांचा ह्यात दोष आहे हे स्पष्टच आहे ना. शरद पवार मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना का काहीच करायला सांगत नाहीत? नुसते गप्प आहेत. आताही शरद पवारांनीच बनवलेलं सरकार आहे. नाहीतर हे सरकार अशक्यच होतं. नाहीतर उद्धव ठाकरे आयुष्यात मुख्यमंत्री होणं नव्हतं.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाला महाशक्ती बनविण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या डॉ.कलाम साहेबांचं स्वप्न पूर्ण करणे हीच खरी आदरांजली

News Desk

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट! – उद्योगमंत्री उदय सामंत

Aprna

आमच्या मुलीची बदनामी थांबवा, अन्यथा आम्ही सर्व आत्महत्या करू !, पूजाच्या कुटुंबीयांचा इशारा 

News Desk