HW News Marathi
Covid-19

मुंबईत धारावी नाही तर ‘हा’ परिसर ठरतोय ‘कोरोना हॉटस्पॉट’

मुंबई | गेल्या वर्षी कोरोनाने जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत म्हणजे मुंबईतील धारावीत थैमान घातलं होतं. संपूर्ण धारावीला आपल्या विळख्यात घेतलं होतं. यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि आता धारावीसारख्या झोपडपट्टी परिसराऐवजी आता उच्चभ्रू परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. धारावीऐवजी आता कोरोनाने अंधेरीकडे मार्गक्रमण केली आहे. जिथं बहुतेक बॉलिवूड स्टार्स राहतात अशाच भागात कोरोनाचे सर्वात जास्त केसेस आहेत.

सर्वाधिक कोरोना प्रकरणं असलेले देशातील दहापैकी नऊ जिल्हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यात मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. कालच्या (२३ मार्च) आकडेवारीनुसार मुंबईत ३५१२ नवे कोरोना रुग्ण आढळले त्यानंतर आता एकूण ३,६९,४२६ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भाग हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे. शहरातील २३ वॉर्ड्समध्ये या प्रभागात सर्वात जास्त कोरोना केसेस आढळून आले आहेत. अंधेरीत दररोज २०० ते ३०० रुग्ण आढळून येत आहेत.

त्यामुळे आता प्रशासन लवकरच जुहू बीच बंद ठेण्याच्या तयारीत आहे. जुहू बीचवर क्लिनअप मार्शल्स तैनात करण्यात आले आहे. मास्कशिवाय दिसणाऱ्यांना दंड आखारला जात आहे. सोमवारपासून तिथं अँटिजेन टेस्टही सुरू करण्यात आली आहे. तसंच परिस्थिती गंभीर झाल्यास पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे, अशी पालिकेचे सहआयुक्त माहिती विश्वास मोटे यांनी दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.“दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे.” असं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला केले कळकळीचं आवाहन  

News Desk

‘बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही’, शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल

News Desk

कोरोनाच्या काळात फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल!

News Desk