HW News Marathi
Covid-19

१ एप्रिलपासून ४५ पेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार !

दिल्ली | देशामध्ये कोरोनचा कहर पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या लसीकरणालाही देशात सुरूवात झाली आहे आता यामध्ये सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने आता ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरीकांना १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे.देशात १ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे.यासंदर्भामध्ये कंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे.

आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर आता ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत देशात चार कोटी ८५ लाख लोकांना करोनाचे डोस देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मागील २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना करोनाचे डोस देण्यात आले आहेत असंही जावडेकरांनी सांगितलं.

कोरोना लसीकरण आत्तापर्यंत कसं पार पडलं ?

देशामध्ये कोरोनाच्या लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवा आणि करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले होतं. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचं लसीकरण देशात सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर एक मार्चपासून ४५ हून अधिक वय असणाऱ्या आणि इतर व्याधी असणाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये करोना टास्क फोर्सचा सल्ला आणि वैज्ञानिक आधारांच्या सहाय्याने दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी पहिला निर्णय म्हणजे ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना करोनाची लस उपलब्ध होणार आहे, असं जावडेकरांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तसेच या बैठकीमधील दुसरा महत्वाचा निर्णय असा घेण्यात आला आहे की दोन डोसदरम्यान चार किंवा सहा आठवड्यांचा वेळ असावा असं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र आता कोविशिल्डचा डोस चार ते आठ आठवड्यांच्यादरम्यान घेणं योग्य ठरेल असं संशोधकांना दिसून आलं आहे. त्यामुळे ही सवलतही देण्यात आली आहे, असंही जावडेकरांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी ५ जागांवर लढणार, विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार !

News Desk

राज्य सरकारकडून वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता 

News Desk

कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा, आता फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्रं

News Desk