HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता गृहमंत्र्याकडे मागणी करणार!

मुंबई | एमपीएसी परिक्षेसंदर्भात राज्यभर आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याबाबत हे राज्यसरकार गांधीजींचे विचार मानणारे असल्यामुळे २४ तासात निर्णय बदलला.

परंतु केंद्रसरकार सारखे हिटलरचे विचार मानणारे असते तर १०० दिवस होऊनही शेतकरी आंदोलनाकडे पाहिले नाही तसे झाले असते याची आठवण महेबूब शेख यांनी करुन दिली आहे. गेल्या ५ वर्षामध्ये भरती न करणार्‍या भाजपवाल्यांचे पुतणा मावशीचे प्रेम राज्यातील युवकांना माहित आहे असेही महेबूब शेख म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अ कृषी जमिनीसाठीची अट शिथिल

News Desk

Maharashtra Winter Session 2021 : विरोधक महाविकासआघाडी सरकारला ‘या’ मुद्द्यांवर घेणार

Aprna

‘पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरुद्ध लोकायुक्तांकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल!’

News Desk