HW News Marathi
Covid-19

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका ! भाजपने मुंबई महापौरांना सुनावले 

मुंबई | राज्यात सद्यस्थितीत कोरोनाचे मोठे आव्हान असताना आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण आहे. राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याची समस्या गंभीर आहे. मात्र, मुंबई प्रशासनाने या काळात ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्याचे सर्वोच्च न्यायालायनेही कौतुक केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या कौतुकानंतर आता मात्र राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयनानंतर भाजपवर निशाणा साधताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या कि, “न्यायालायने केंद्राची कानऊघडणी केली आहे. आतातरी बोध घ्यावा.” तर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई मनपाला टोला लगावला आहे.

“अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. मुंबईत अजूनही बेड मिळत नाहीत. लसीकरणाचा गोंधळ आहे”, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी महापौर पेडणेकर यांना सुनावले आहे. “न्यायालयाने कौतुक केले ही चांगली बाब आहे. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. मुंबईत आज बेड मिळत नाहीत. लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. याकडे लक्ष द्यायला हवे”, अशा खोचक शब्दात प्रवीण दरेकर यांनी मुंबई मनापाला सल्ला देखील दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कौतुकानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले होते ?

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेचे कौतुक करत केंद्र सरकारला सूचना करताना म्हटले होते की, “ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने मुंबई प्रशासनाकडून माहिती घ्यावी. त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा कसा व्यवस्थित ठेवला हे पाहावे. त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेता येतात का तेही पाहावे.” दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या सुचनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच पेटले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात आज ७,०७४ नवे कोरोना रुग्ण आढळले, राज्याने ओलांडला २ लाखांचा टप्पा

News Desk

पुण्यात सलून-ब्युटी पार्लरकरिता पाळावेच लागणार ‘हे’ नियम

News Desk

राज्यात आज ११,०६० रुग्ण झाले कोरोनामुक्त

News Desk