HW News Marathi
महाराष्ट्र

PandharpurElection : सातव्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे यांची १ हजार मतांची आघाडी

पंढरपूर | राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे मात्र निवडणूकीची रणधुमाळी सुरु होती. १७ एप्रिलला या पोटनिवडणूकीसाठी मतदान पार पडले होते.राज्यात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. दरम्यान,१७ एप्रिलला या मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली होती.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचेच सुपुत्र भगीरथ भालके यांना तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ह्याच दोन उमेदवारांमध्ये मोठी चुरशीची लढत आहे. भाजप-राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.

आज (२ मे) या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या विधानसभेच्या या निवडणूकींचे मतमोजणीत सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली आहे.पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर होते तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके पिछाडीवर होते. ही मतमोजणी अतिशय जोरदार सुरु असून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्याच फेरीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आघाडीवर होते. तर खेळी पलटून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर आहेत.

तिसरी फेरी

भगीरथ भालके – ८६२३

समाधान आवताडे – ७९७८

६३५ मतांनी भालके आघाडीवर होते.

चौथी आणि पाचवी फेरी

भगीरथ भालके – ३३२८

समाधान आवताडे – ३३२५

सातवी फेरी

सातव्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे यांची १ हजार मतांची आघाडी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेची ताकद कमी होतेय, सिंधुदुर्गातील जनता आता शिवसेनेला साथ देणार नाही !

News Desk

पंकजा मुंडेंनी परदेशातून कारखान्यासाठी पाठपुरावा केला का ? धनंजय मुंडेंचा सवाल

News Desk

विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे असले पाहिजे – अजित पवार

News Desk