HW News Marathi
महाराष्ट्र

‘माकडवस्थेत’ जाऊन झाडावरची पानं – फुलं खाऊन जगावं की काय? रुपाली चाकणकरांचा सवाल

मुंबई | मोदीसाहेब ,आपण देशावर अशी वेळ आणली आहे की आता ‘अश्मयुगात’ सुद्धा नको तर मानवाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली त्या “माकडवस्थेत” जाऊन झाडावरची पानं – फुलं खाऊन जगावं की काय…?असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ट्विटद्वारे मोदींना केला आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल ३ वेळा गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतकी वाढ करण्यात आल्याचा आरोपही रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये अनुक्रमे २५,५०,२५ इतकी सिलेंडरची किंमत वाढवली गेली आहे.हे कमी होते म्हणून की काय आज १ मार्च रोजी पुन्हा २५ रुपयांनी गॅस दरवाढ पंतप्रधान मोदीसाहेबांनी केली आहे असेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या महिला बालकल्याण विभागातल्या महाघोटाळ्याची स्मृती इराणींना भेटून चौकशी करण्याची केली मागणी!

News Desk

“कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?”, गोपीचंद पडळकरांचा खोचक सवाल 

News Desk

“आपल्याला संपवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना…”, नाना पटोलेंचा सूचक इशारा

News Desk