HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धवजींनी जे केलं ते शरद पवार यांनाही मुंडे प्रकरणात करता आलं असतं – चंद्रकांत पाटील

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादीचे अध्यक्षव शरद पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत तेच करायला हवं होतं. त्यांनीही मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. ते प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आहेत. त्यानुसार आधीच ठाकरी बाणा दाखवायला हवा होता, असं सांगतानाच उद्धवजींनी जे केलं ते शरद पवार यांनाही मुंडे प्रकरणात करता आलं असतं. त्यांनी मुंडेचा राजीनामा घ्यायला हवा होता, असं पाटील म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

RBIने वसंतदादा सहकारी बॅंकेचं लायसन्स केलं रद्द

News Desk

ठाकरे सरकारमध्ये तीन महिलांना मंत्री पदे, शिवसेनेच्या एकाही महिलेला स्थान नाही

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ पुन्हा वाढणार, ‘हा’ आमदार करणार राष्ट्रवादीत एन्ट्री!

News Desk