HW News Marathi
Covid-19

विरार रूग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी । छगन भुजबळ 

मुंबई | विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून १३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ही अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज (२३ एप्रिल) व्यक्त केली आहे. आगीच्या दुर्घटनेत झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्युबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. राज्यात कोरोनाचे संकट असताना अश्या घटना घडणे दुर्दैवी आहे. सर्वांनाच आता दक्ष राहून काम करावे लागणार आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या नागरीकांना श्रद्धांजली वाहतानाच त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना असल्याच्या भावना देखील मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

“२ दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेच्या रूग्णालयात मोठा अपघात घडला. त्यातून महाराष्ट्र सावरत नाही तोच दुसरा मोठा अपघात विरारच्या कोरोना रूग्णालयात घडला आहे. महाराष्ट्रातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे कोरोना रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना अशी घटना घडणे हे वेदनादायी आहे. महाराष्ट्र लवकरच या संकटातून बाहेर पडो”, अशी प्रार्थना असल्याचेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुंभमेळ्यात शाहीस्नानानंतर १०२ जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

पुण्यात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ‘या’ संस्थेच्या वसतीगृहाचा ताबा घेण्याचे न्यायालयाचे आदेश

News Desk

येत्या आठवड्यापासून पुण्यातील निर्बंधही शिथिल होणार!

News Desk