HW News Marathi
देश / विदेश

आदित्य ठाकरेंचे मोदींना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याची केली मागणी 

मुंबई | ‘कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाचा परीक्षा घेऊ नये’, अशी विनंती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ‘परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा’, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.कोरोनाच्या संकटकाळात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत सुप्रीम कोर्टात आज (२४ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर या आधी १८ ऑगस्टला सुनावणी झाली होती. या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज सुप्रीम कोर्ट याबाबतचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर होण्याआधी आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याती विनंती केली आहे

यूजीसीने देशभरातील विद्यापीठांना ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. देशात अनेक राज्यांत कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेण्यास अनेक स्तरांतून विरोध केला जात आहे. ‘यूजीसी’ मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. ६४० पैकी ४५४ विद्यापीठांनी परीक्षा घेतल्याचे ‘यूजीसी’ने सांगितले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मित्राच्या मदतीने पत्नीवर बलात्कार

News Desk

वडिलांचा मृत्यू झाला असल्यासही मुलीला मालमत्तेत  समान वाटा, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk

विधानसभेच्या १९९ जागांसाठी राजस्थानमध्ये मतदान सुरु

News Desk