HW News Marathi
देश / विदेश

गांधी हा एक परिवार नसून या देशाचं DNA आहे – यशोमती ठाकूर 

मुंबई | “गांधी हा एक परिवार नसून या देशाचं एक डीएनए आहे. तसेच, सोनिया गांधी यांनी देखील पक्ष ज्या-ज्या वेळेला अडचणीत होता त्यावेळेस जोमाने काम केलं आहे”, असे मत महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी मांडले आहे. सध्या काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या घुसळणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली.

या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, गांधी हे केवळ एक कुटुंब नाही तर तो भारताचा डीएनए आहे. जर सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडायचा निश्चयच केला असेल तर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व करायला पाहिजे. देशाला राहुल गांधी यांची गरज आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक (CWC) सुरू झाली आहे. वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बदलावा अशी पत्राद्वारे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मागणी केल्यानंतरच ही CWC ची ही बैठक होत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? – जयंत पाटील

News Desk

राज्यसभेत जम्मू-काश्मीर विभाजनचा प्रस्ताव मंजूर

News Desk

पी व्ही सिंधू ‘सुवर्ण’ पदकाच्या शर्यतीतून बाद, भारताच्या पदरी निराशा!

News Desk