HW News Marathi
Covid-19

राज्यात काही दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नका, सरकार तुमची काळजी घेईल

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यात आता राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता साखळी तोडण्यासाठी १२ ते १३ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी रांग लावून तयार आहेत. त्यांना गावी न जाण्याचे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

“राज्यात लॉकडाऊन जरी जाहीर केला गेला तरी सरकार सर्व परप्रांतीय कामगारांची सर्व काळजी घेईल. कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला हे आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये”, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोळसा क्षेत्रातील सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणली जाईल | निर्मला सीतारामण

News Desk

साताऱ्यात १७ जुलै पासून पुन्हा लॉकडाऊन ! जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद राहणार?

News Desk

दोन कोरोना लाटेतील सहकार्याप्रमाणे जनतेने प्रशासनाला मदत करावी! – नितीन राऊत

Aprna