HW News Marathi
महाराष्ट्र

यश जेव्हा यायचं तेव्हा येईल, त्यासाठी तुम्ही धीर सोडू नका… राज ठाकरेंचे भावनिक पत्र!

मुंबई | “राज साहेब अखेरचा जय महाराष्ट्र. मला माफ करा. पैसा आणि जात या दोनच गोष्टींवर राजकारण चालतं, या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत”, असे म्हणत सुनील ईरावर या मनसैनिकाने आत्महत्या केली होती. यावर एक पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मनसैनिकांना लिहिले आहे. यात त्यांनी सर्व मनसैनिकांना धीर सोडू नका, असे आवाहन केले आहे.

“यश जेव्हा यायचं असेल तेंव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल. सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका”, अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे. 

“संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं”, असं राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार -मुख्यमंत्री

News Desk

राज्यातील कॉलेज दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती!

News Desk

कंगणाला महाराष्ट्रात आणि मुंबईत राहण्यातच अधिकार नाही – गृहमंत्री

News Desk