HW News Marathi
Covid-19

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फेल?”, मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

मुंबई | देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट अत्यंत भयंकर आहे. ही लाट एवढी भयंकर आहे की तिच्यासमोर धारावी पॅटर्नही फोल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसे सुतोवाच केलं आहे. त्यामुळे प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भीती व्यक्त केली. यापूर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केले होते. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतूक केले होते. पण आता परिस्थिती विचित्र झाली आहे.

कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही, हे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

व्यापाऱ्यांना कळकळीची विनंती

यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना रस्त्यावर न उतरण्याची कळकळीची विनंती केली. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असं आवानह मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ११,१११ नवे रुग्ण आढळले तर ८८३७ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

कोरोनाबाधितांची लूट करणाऱ्या मुंबईतील ३७ खाजगी रुग्णालयांना पालिकेचा दणका 

News Desk

गिरीश महाजन यांनी चंद्रकांत पाटील यांची केली पाठराखण, तर खडसेंच्या सहकार्याची आम्हाला गरज !

News Desk