HW News Marathi
महाराष्ट्र

‘अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन ‘शेलारांची शिवसेनेवर प्रखर टिका !

मुंबई | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. ‘भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये’ अशी टीका शिवसेनेने केली होती. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेने नागपूरमध्ये जाऊन हिंदुत्वाचा क्लास लावावा, असा टोला लगावतानाच अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

एल्गार परिषदेत हिंदूंविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा शरजील उस्मानी याला पळवून लावण्यात आलं आहे. त्याला पळवून लावण्यास कोणी मदत केली. सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा हात आहे. एल्गारची पार्श्वभूमी माहीत असतानाही एल्गार परिषदेला परवानगी का देण्यात आली? असा सवाल करतानाच भाजपच्या आंदोलनानंतर सरकारला दोन दिवसाने जाग आली. त्यानंतर शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर शिवसेना ही अमिबालाही लाज वाटेल अशा पद्धतीने दिशाहीन झाल्याचंच हे लक्षण आहे, अशी टीकाही शेलारांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ‘मिशन मोड’ वर राबवाव्यात! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

राज्यात मध्यावधी निवडणूक होणार नाही !

News Desk

सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाकडून पुन्हा मंदिराचे राजकारण !सचिन सावंत

News Desk