HW News Marathi
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यासाठी “एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी” ची आगामी तीन वर्षासाठी निवड!

बीड | बीड जिल्ह्यासाठी पिक विमा योजना राबवण्याबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज(१७ जुलै) घेण्यात आली.

या बैठकीस कृषी मंत्री दादाजी भुसे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कृषी सचिव एकनाथ डवले तसेच कृषी आयुक्त उपस्थित होते. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सवर झालेल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच दिली.

धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे बीड जिल्ह्यासाठी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीची आगामी तीन वर्षासाठी निवड करण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश आज संध्याकाळपर्यंत निघणे अपेक्षित असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.याशिवाय लॉक डाऊन मुळे जिल्ह्यातील बँका बंद असल्याने पिक विमा भरण्यासाठी ३१ जुलै ही असणारी मुदत आणखी एक महिना वाढवून मिळावी यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्याचे विनंती करण्याचेही आजच्या बैठकीत ठरले.

बीड जिलाह्यासाठी पिक विमा कंपनी उपलब्ध करून देऊन तीन वर्षाचा प्रश्न एकदाच मिटवल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कृषिमंत्री इत्यादींचे आभार मानले . शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्स पालन करत खरिपासाठीचा विमा करावा असे आवाहनही यावेळी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार-ठाकरेंच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

News Desk

फडणवीसांनी ‘ओबीसीं’चे नेतृत्व करावे!

News Desk

नागपूरमध्ये नाराज शिवसैनिकांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk