HW News Marathi
महाराष्ट्र

युतीमुळे ठाण्यात शिवसेनेचा महापौर झाला, मात्र आता चित्र बदलेले दिसणार -आशिष शेलार 

ठाणे | ठाण्याच्या इतिहासात भाजप आणि शिवसेनेच्या युतीमुळेच शिवसेनेचा महापौर आतापर्यंत झाला, मात्र आता हे चित्र बदलेले सर्वांना दिसणार असून ठाण्यात भाजपचा महापौर बसणार असा विश्वास भाजपचे ठाणे प्रभारी आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. कोपरी येथे भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. आज (९ जानेवारी) शेलार देवीच्या दर्शनासाठी आले असताना त्यांनी हे विधान केले. तसेच ठाण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाऊन समाजसेवा करण्याचा सूचना यावेळी शेलार यांनी दिल्या.

भंडारा येथील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे

भंडारा येथील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. राज्य सरकारच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये दिरंगाई होते बेपरवाई होते हॉस्पिटलचा ऑडिट,इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व गोष्टीमध्ये दिरंगाई होत आहेत. या दुर्दैवी घटनेची सात दिवसात चौकशी झाली पाहिजे आणि सात दिवसात जे कोणी दोषी आहेत त्यांना कडक शासन होवून परिवाराला जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे हे आमची मागणी आहे असं मत भंडारा दुर्घटनेवर आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

नामांतर वरून वाद

तर मुख्यमंत्री सेक्युलॅरिझम मध्ये बसत नाही असं म्हणायचं जे औरंगजेबीची वृत्तीने आणि औरंगाबादच म्हणू अशा लोकांबरोबर सत्तेला मांडीला मांडी लावायची ते मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वात बसता का? असा सवाल यावेळी शेलार यांनी करत टोला देखील संभाजीनगर या वादावरुन आशिष शैलार यांनी लगावला आहे.

बिघडलेल्या आघाडीने राज्याला बिघडू नये

महाविकासआघाडी पहिल्यापासून बिघाड आहे. सकाळ बिघाड,दुपार बिघाड, संध्याकाळ बिघाड, रात्री बिघाड आणि बिघडलेली आघाडी असल्याने यांनी या राज्याला बिघडू नये एवढीच आमची इच्छा असल्याचे यावेळी आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन साधला संवाद

Aprna

शेतकरी विधेयकावर कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी, त्यांना शेतकऱ्यांविषयी प्रेम नाही!

News Desk

दहावीचा निकाल : यंदाही मुलींची बाजी, ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

News Desk