HW News Marathi
Covid-19

मुंबईत ११३ % नालेसफाई झाल्याचा दावा करणारे आणि कंत्राटदारांची पाठराखण करणारे आता कुठे आहेत?

मुंबई | गेले २-३ दिवस महाराष्ट्र आणि मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी भरले. यावरूनच भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे. पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी पाणी तुंबल्याने महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यावर शेलार यांनी टीका केली आहे.

मुंबईत ११३ % नालेसफाई झाल्याचा दावा करणारे आणि कंत्राटदारांची पाठराखण करणारे आता कुठे आहेत,’ असा सवाल शेलार यांनी आयुक्तांना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. मुंबईत ११३% नालेसफाई झाल्याच्या आयुक्तांच्या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच! हे होणारच होते, कारण ४०% पेक्षा जास्त नालेसफाई झालेली नाही. आता कुठे आहेत ते ११३% चे दावे करणारे? कोट्यावधींची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता गायब? असा सवाल करत आयुक्तांना कोंडीत पकडले आहे.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नालेसफाई रखडली होती. कारण, नाल्यांची सफाई करणारे मजूर गावी गेल्याने ते काम कसे होणार हा प्रश्न होताच. मात्र, आयुक्त चहल यांनी कामाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नालेसफाईच्या कामांना वेग देण्याचा प्रयत्न केला होता. पूर्ण सफाई झाल्याचे दावेही केले होते. मात्र, दरवर्षी सारखे या वर्षीही मुंबईकरांना मुंबईची तुंबई पाहायला आणि अनुभवायला मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजासाठी ३ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा ! चंद्रकांत पाटलांची मागणी

News Desk

अजित पवारांचे कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार काम सुरु!

News Desk

देशातील ‘या’ राज्यात १९ जूनपासून लॉकडाऊन वाढवला

News Desk