HW News Marathi
Covid-19

राज्यात ५८ हजार ५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू | राजेश टोपे

मुंबई | कोरोनाच्या ३ हजार ८७४ नवीन रुग्णांचे निदान काल (२० जून) झाले असून सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्के एवढा आहे. राज्यात काल १३८० रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात एका दिवसात १६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण संख्या ६४ हजार १५३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह (१७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५९८४ झाली आहे. काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-१३६ (मुंबई १३६), नाशिक-१० (जळगाव १०), पुणे-६ (पुणे ५, सोलापूर १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ६, जालना १), लातूर-१ (बीड १).

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानात सहभागी व्हा ! जयंत पाटलांचा थेट संरपचांना फोन

News Desk

देशाच्या अर्थव्यवस्थेवर रघुराम राजन यांच्यासोबत राहुल गांधींनी केली ‘या’ मुद्द्यावर चर्चा

News Desk

दिलासादायक ! राज्यात १४ लाखांहूनही अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk