HW News Marathi
Covid-19

बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा रद्दच !

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबाबत ‘आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’सोबत बैठक पार पडली. यात विशेषतः व्यवसायिक, अव्यवसायिक अभ्यासक्रम आणि एटीकेटी अशा टप्प्यात निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (१९ जून) यांची अधिकृत घोषणा केली. उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी संवाद साधून ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे एटीकेटी संदर्भातील येत्या २ दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचेही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे सरासरी गुणांच्या आधारे त्यांना पदवी प्रदान करण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे तसेच ज्यांना द्यायची नाही अशा दोन्ही विद्यार्थ्यांना तसे विद्यापीठाला लेखी द्यावे लागेल, असे उदय सामंत यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल त्या विद्यार्थ्यांची परीक्षा कधी घ्यायची ? याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. “बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला आहे”, ही महिपती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या बांधकाम व्यवसायबाबत शरद पवारांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र

News Desk

चिंताजनक ! आरोग्यमंत्र्यांसह बैठकीत असतानाच मालेगाव आयुक्तांचा ‘कोरोना पॉझिटिव्ह’ रिपोर्ट समोर

News Desk

एफआयआर दाखल करण्यामागे राजकीय षडयंत्र, अर्णब गोस्वामींचा दावा

News Desk