HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारचे अस्तित्व कुठेच दिसत नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई | एकीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकड काही मागण्या केल्या आहेत. कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज ( १३ जून) भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी कोकणासाठी विविध मागण्या केल्या.

“कोकण चक्रीवादळाच्या दौऱ्यात माझ्यासमोर जे सत्य आले, ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. वादळग्रस्तांना एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. सरकारचे अस्तित्व कुठेच दिसत नाही, लोकांना शाळांमध्ये कोंबून ठेवले आहे, विदारक चित्र उद्धवजींसमोर मांडले. लोकांना तात्काळ रोख रक्कम मिळायला हवी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली, असे फडणवीस यांनी सांगितले.

झाडे उन्मळून पडली आहेत, हेक्टरी ५० हजारांची मदत तोकडी आहे. झाडे पुढची १० वर्षे उत्पादन देऊ शकणार नाहीत. त्यामुळे फळ पिकांची योजना लागू करुन त्यांना मदत करणे आवश्यक आहे,” असा सल्लाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिला.

नागरिक घराबाहेर राहतील, तोपर्यंत घरभाडे द्यावे

“झाडं पडली आहेत, ती साफ करणे आवश्यक आहे. पावसामुळे रोगराई पसरु शकते. त्यासाठी रोजगार हमीची कामं हाती घ्यावी, त्यासाठी वनविभागाची मदत घ्यावी,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल परबांच्या निवासस्थानाबाहेर शाई फेकण्याचा प्रयत्न; पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

भीमा-कोरेगाव परिसरात काही संघटनांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला

News Desk

कोठेवाडी येथील भगिनींना महाराष्ट्र शासनाची एतिहासिक राखी भेट!

News Desk