HW News Marathi
Covid-19

जळगावमधील ‘कोरोना’चा मृत्यूदर कमी करण्यासाठी टास्क फोर्स !

जळगाव | “जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यासह राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे हा मृत्यूदर कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने टास्क फोर्स गठित करुन त्यांचा सल्ला व औषधोपचार घ्यावेत. तसेच कोरोना विषाणूचा तपासणी अहवाल २४ तासांत प्राप्त होईल असे नियोजन करावे”, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे आज (३ जून) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

जळगावमधील आढावा बैठकीत बोलताना राजेश टोपे म्हणाले कि, जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यातील ही रुग्णसंख्या आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणातून कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत. तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी तातडीने करावी. तसेच सर्वेक्षण व तपासणी अचूक आणि परिणामकारक करावी, अशा सूचनाही राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आजच्या (३ जून) या बैठकीत पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भाजप खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, महापौर भारती सोनवणे, भाजप आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानलं राव! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिवीर उत्पादनाचा परवाना

News Desk

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

News Desk

“आम्ही जेव्हा लस घेऊ तेव्हा तुम्हाला सांगू”, अजित पवारांचे पत्रकारांना सडेतोड उत्तर

News Desk