HW News Marathi
Covid-19

मुंबईत आज आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा बिकट स्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांना सुरक्षा देणाऱ्या पोलीस दलात मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. मुंबईत कोरोनामुळे आज (२१ मे) पोलीस दलातील ११ व्या मृत्यूची नोंद झाली आहे. एटीएसच्या हेड कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात एकूण १६ पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पोलीस दलामध्ये समोर येणारी कोरोनाची प्रकरणे निश्चितच राज्याची चिंता वाढवणारी आहेत.

कोरोनामुळे आज मृत पावलेले पोलीस हेड कॉन्सटेबल हे एटीएस पथक नागपाडा युनिट येथे ११ मेपासून टाइफाईडवर उपचार घेत होते. त्यांना डायबेटीसचा आजार देखील होता. काही दिवसांनी त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील होऊ लागली होती. मात्र, त्यानंतर 17 मे पहाटे त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना सर्वप्रथम नायर आणि तयनानंतर भाटीया रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. गुरुवारी या चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.

शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा काहीच दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला. अवघ्या ३२ वर्षांच्या या पोलीस अधिकाऱ्याच्या निधनाने संपूर्ण पोलीस दलात चिंता पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता पोलीस दलातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आता राज्य सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक झाले आहे. सर्वसामान्यांना सुरक्षा देणाऱ्या पोलीसांच्याही सुरक्षेचा तितक्याच गांभीर्याने विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk

कोरोना काळात ऑक्सिजन निर्मितीसाठी योगी सरकार राबवणार “शरद पवार पॅटर्न”!

News Desk

आज २९३३ नवीन रुग्णांची नोंद, राज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

News Desk