HW News Marathi
देश / विदेश

रेल्वेने ३९२ ‘फेस्टिव्हल विशेष गाड्या’ चालवण्याचा घेतला निर्णय

नवी दिल्ली | देशात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. देशात नव्या कोरोना रूग्णांची नोंद होत असली तरी कोरोना संकटावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे दिलासा मिळत आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्व लोकल गाड्या आणि एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. परंतु लॉकडाऊन उठवल्यानंतर अनलॉक प्रक्रियेच्या माध्यमातून काही प्रमाणात लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या ‘विशेष ट्रेन’ म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत.

सध्या सर्वत्र मोठ्या सणांची चाहूल लागली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधांची काळजी घेत रेल्वेने ३९२ ‘फेस्टिव्हल विशेष गाड्या’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय गाड्यांची यादी संबंधित झोनला पाठवण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. राजधानी, शताब्दीसह तेजस आणि हमसफर गाड्या देखील पुन्हा रेल्वे रुळावर धावणार आहेत. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरपर्यंत राजधानी, शताब्दी, तेजस आणि हमसफर एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. त्यामुळे आता रूळावर ४१६ विशेष गाड्या धावणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इराणमध्ये युक्रेनचे विमान कोसळले, १७० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

News Desk

Budget2022 Live Updates: अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प! – जयंत पाटील

Aprna

निवडणुकांच्या तोंडावर फेसबुकचे सावध पाऊल

Gauri Tilekar