HW News Marathi
व्हिडीओ

वीजपुरवठा बंद अन् अख्खी मुंबई ठप्प ! नेमकं काय घडलं ? दोष कोणाचा ?

मुंबई आणि उपनगरात आज (१२ Oct.) सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे, “भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगा”, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. विरोधकांकडून देखील या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर चांगलेच तोंडसुख घेण्यात आले आहे. हे नेमके काय आणि कसे घडले ? जाणून घेऊया. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी ४ वाजता ‘वर्षा’वर एक महत्वाची बैठक बोलाविली होती. या बैठकीत, नेमकी काय चर्चा झाली किंवा नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

#CMUddhavThackeray #MumbaiPowerCut #MumbaiPowerOutage #NitinRaut #Mumbai #MumbaiBMC #BMC #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Fadnavis याचं ‘मी पुन्हा येईन’ हे सत्यात कधी येणार हे माध्यमांनी सांगावं, Jayant Patil यांचा टोला!

News Desk

Osmanabad NCP | ‘एकचं साहेब पवारसाहेब’ उस्मानाबादमध्ये पवारांसाठी धरणे आंदोलन..

Arati More

Radhakrishna Vikhe Patil | विखे पाटलांचा आमदारकीचा राजीनामा, भाजप प्रवेश लवकरच

News Desk