HW News Marathi
Covid-19

गरीब, कष्टकरी व मजूरांचा घरी जाण्याचा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार

नवी दिल्ली | ज्या गरजू कामगारांना घरी परतण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करेल, असे पत्रक काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हणाल्या आहेत. या पत्रकानुसार प्रत्येक राज्यातील काँग्रेस कमिटी गरजू, कामगार आणि मंजूरांचा रेल्वे प्रवासाचा खर्च उचलणार असल्याचे सोनिया गांधींनी आज (४ एप्रिल) पत्रक लिहिले आहे.

केवळ चार तासांचा अवधी देऊन लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे देशभरातील अनेक मजूर घरी परतण्यापासून वंचित राहिले. १९४७ मध्ये जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हाही देशाने हृदय पिळवटून टाकणारी अशी स्थिती पाहिली होती. ज्यामुळे देशभरातील हजारो मंजूर, कामगार आदींनी शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत आपले घर गाठण्याची परिस्थिती झाली होती.

पण, देश आणि सरकारचे कर्तव्य काय आहे? आजही लाखो मंजूर आणि कामगार संपूर्ण देशातील विवध कानाकोपऱ्यातून घरी परत जाऊ इच्छितात आहे. पण, त्यांच्याकडे कोणतेही साधन आणि पैसाना नाही. भारत सरकार व रेल्वे मंत्रालय या मंजूरासाठी अत्यंत कठीण आणि अव्हानात्मक काळातही रेल्वे प्रवास भाडे वसूल करत आहे, असा आरोप सोनिया गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

जेव्हा रेल्वे मंत्रालय पंतप्रधानांच्या कोरोना फंडासाठी १५१ कोटी रुपये देशू शकतो तर देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या या श्रमिकांसाठी आपण अशा संकट काळात निशुल्क रेल्वे सेवाक का देऊ शकत नाही?, असा सवालही सोनिया गांधींनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्राच्या पॅकेजमध्ये प्रत्यक्ष मदतीपेक्षा घोषणा अन् आकड्यांचाच मारा अधिक

News Desk

यंदा गणेशोत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी नाही

News Desk

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ‘कोरोना पॉझिटिव्ह’

News Desk