HW News Marathi
राजकारण

शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकला

दिल्ली | शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका ८ जूनला न घेता त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांनी सोमवारी दिल्लीत भारत निर्वाचन आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांना निवेदन देऊन केली. यावेळी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे सोबत होते. निवडणूक आयुक्तांनी या मागणीबाबत उचित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

पाटील, मोरे यांनी निवेदनात ८ जून रोजी निवडणूक झाल्यास सुट्टीमुळे बाहेरगावी गेलेले मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतील, असे आयोगाच्या निदर्शनास आणूस दिले. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चारही निवृत्त होणाऱ्या विद्यमान विधान परिषद सदस्यांची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपत आहे. मागच्या टर्मची (२०१२) निवडणूक २ जुलै २०१२ रोजी झाली होती. त्यापूर्वी २००६ मध्येही असाच प्रकार झाला होता. ८ जून २००६ ला निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यावेळीही शिक्षक भारतीने दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाला वस्तुस्थिती सांगितली होती. त्यानंतर तारीख बदलून २४ जून २००६ रोजी निवडणूक घेण्यात आली होती. आताही शिक्षकांची हीच अपेक्षा आहे, असे सुभाष मोरे यांनी सांगितले.

मे महिन्याच्या सुट्टीमुळे शिक्षक आपापल्या गावी किंवा बाहेरगावी कुटुंबासमवेत गेले आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्येही ही स्थिती आहे. बहुतांश लोक मुलांना सुट्टी असल्यामुळे आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर जातात. शाळा १५ जून व १८ जून रोजी सुरू होत असून त्याआधी ८ जून रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानाला परत येणे निव्वळ अशक्य आहे. मुंबईला परत येण्याचे आरक्षणही ठरलेले असते, इतक्या लवकर ते बदलणे किंवा तिकीट मिळणे ही बाब शक्य नाही. त्यामुळे निवडणुका शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर घेण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेवटी शिवसेनेलाच हिंदुत्वाची वज्रमूठ आवळावी लागली!

swarit

#MarathaReservation : मराठा आरक्षणाला पुन्हा आव्हान, रिट याचिका दाखल

News Desk

चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत ?

News Desk
राजकारण

मनसेतून सेनेत आलेल्या सहा नगरसेवकांना तुर्तास दिलासा

News Desk

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मनसेतून दिलीप लांडेंच्या नेतृत्वाखाली मनसेतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या संदर्भात मनसेने कोकण आयुक्तांकडे आव्हान दिले. याप्रकरणाचा निकाल तीन महिन्याच्या कालावधीत येणे अपेक्षित होते. परंतु, चार महिन्यानंतरही निकाल अद्याप आला नसून वारंवार आयुक्त गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणाची सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली होती परंतु कोकण आयुक्त जगदीश पाटील गैरहजर राहिल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली आहे. दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलल्यामुळे तुर्तास या नगरसेवकांना दिलासा मिळाला असला तरी मनसे मात्र आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

 

 

Related posts

HW Exclusive : ईडी, सीबीआय अन् आयटी तपास यंत्रणा पंतप्रधानांच्या बंगल्याबाहेरील शेपूट हलवणार कुत्रे! – भाई जगताप

Aprna

“मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकरी भरतीच्या मुलाखती चेन्नईमध्ये का?,” आदित्य ठाकरेंना सवाल

Aprna

…जेव्हा गिरीश महाजन गरबा खेळतात

News Desk