HW News Marathi
देश / विदेश

आई-वडिलांनी मुलीला चांगले संस्कार दिले तर बलात्कार थांबतील, भाजप आमदाराचे मोठे वक्तव्य

मुंबई | भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशच्या हाथरस आत्महत्या प्रकरणावर अतिशय धक्कादायक वक्तव्य केले आहे. बलियाच्या बेरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी असे म्हटले आहे की,’सगळ्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार द्यायला हवेत. तेव्हाच बलात्कारासारख्या घटना थांबतील.’ आमदारांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

 

‘मी आमदार तर आहेच, पण एक शिक्षकही आहे. बलात्काराच्या घटना या संस्कारामुळे थांबू शकतील. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार देऊन त्यांना शालीन व्यवहाराचे शिक्षण देण्याची गरज आहे. बलात्काराच्या घटना काही सरकार किंवा तलवारीमुळे थांबणार नाहीत. संस्कार हा महत्वाचा मुद्दा आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देता येईल. सुरक्षा पुरवणे ही सरकारची जबाबदारी असेल तर प्रत्येक कुटुंबाला आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही सुरेंद्र सिंह म्हणाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खाद्यपदार्थ किती टिकणार, ते पाकिटावर लिहिणे बंधनकारक

News Desk

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? कॉंग्रेसच्या या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणतात…

News Desk

‘पीएफ’मुळे नोकरदारांची चिंता वाढली

News Desk