HW News Marathi
देश / विदेश

मोदींमुळे देशात आर्थिक संकटाचे सावट

बंगळुरु | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी धोरणे राबवून अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याने देशावर आर्थिक संकट ओढवले आहे,’ अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.

‘देश सध्या बिकट कालखंडातून जात असून शेतकरी संकटात आहेत, तरुण पिढीला नोकऱ्यांच्या संधी नाहीत आणि अर्थव्यवस्थेचा विकास क्षमतेहून कमी दराने होत आहे. हे टाळता येण्यासारखे होते. तरी देखील टाळले गेले नाही. सर्व आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाण्याऐवजी चुका व त्रुटी दाखविण्यांची तोंडे बंद करण्याची सरकारची वृत्ती’, असल्याचे सिंग यावेळी बोलत होते.

मोदी सरकार ही देशाची अर्थव्यवस्था चांगली असल्याचे चित्र रंगवित आहे. संपूर्ण जगभरात प्रतिकूल परिस्थिती असून देखील देशात विकासदर सरासरी ७ टक्के राहिला होता. एकदा तर तो ८ टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचला होता. कर्नाटक विधानसभा निवडणूक ही मोदी सरकारसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. ही निवडणूक जिंकण्यासाठी मोदी हे प्रचारात पातळी सोडून विधान करत असल्याची टीका मनमोहन सिंग यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#DelhiVoilence : हिंसाचारातील मृतांचा आकडा २० वर, तर १८९ हून अधिक जण जखमी

swarit

पंकजा म्हणतात, मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन ? 

News Desk

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा – शरद पवार

News Desk