HW News Marathi
राजकारण

कॉंग्रेसने जनतेला मुर्ख बनविले

तुमाकुरू | कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांना रंगत आलेली पहायला मिळत आहे. निवडणूकीसाठी अवघे काही दिवसच हातात राहील्यामुळे सर्वच बड्या नेत्यांनी कर्नाटक निवडणूकीकडे विषेश लक्ष दिल्यानेआरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तुमाकुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना शनिवारी पंतप्रधान मोंदीनी कॉंग्रेसवर निशाना साधला. कॉंग्रेसने गरीबांचा कळवळा असल्याचे भासवत जनतेला मुर्ख बनविले असल्याचा आरोप यावेळी मोदींनी कॉंग्रेसवर केला.

 

कॉंग्रेस पक्ष माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळापासून गरीब जनतेचा वापर करत आहे. आजपर्यत या गरीब जनतेसाठी कॉंग्रेसने काहीच केले नाही त्यामुळे जनता कॉंग्रेसला कंटाळली असल्याचे मोदी म्हणाले. त्याचबरोबर कॉंग्रेस आणि जनता दलात अप्रत्यक्ष युती असल्याचा आरोपही मोदींनी यावेळी केला. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असल्याचे भासवतात मात्र, बंगळुरूमध्ये जनता दलाचा काँग्रेसच्या महापौराला पाठिंबा असल्याचे मोदी यावेळी बोलताना म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आज राज्यभर मौनव्रत धारण करत आंदोलन…

News Desk

हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरमधील घर आणि साखर कारखान्यावर EDचा छापा; हे आहे संपूर्ण प्रकरण

Aprna

काँग्रेसच्या नगरसेविका के. पी. केणी यांचे पद रद्द

News Desk
देश / विदेश

जलप्रलयातही देशप्रेम अबाधित!

News Desk

गुवाहाटी : दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काल झालेले स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार कार्यक्रम आपण पाहिले. मात्र आसाममधील लहानशा शाळेसारखा सोहळा काल कुठेही झाला नसेल. पूरपरिस्थितीने वेढलेल्या आसाममध्ये चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन केले. जलप्रलयातही अबाधित राहिलेले हे देशप्रेम सध्या सोशल मिडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

आसाममधील ढुबरी जिल्ह्यात फकीरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नसकारा सरकारी शाळेतील हे छायाचित्र असून येथील सहायक शिक्षक मिजानूर रहमान यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर टाकल्यानंतर काही तासांतच ते तब्बल ६० हजार जणांनी शेअर केले. सोशल मिडियावर मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल रहमान यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने आसामसारख्या दुर्गम भागातील समस्यांना वाचा फुटल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘आम्हाला पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. वीजेची समस्याही मोठी आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आणि चार्ज करायला वीजही नव्हती. रस्ते आणि दळणवळणाच्या अन्य सुविधाही येथे आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत. याकडे शासनाने लक्ष पुरवावे,’ असे रहमान यांनी म्हटले आहे.

Related posts

#Chandrayaan2 : पंतप्रधान मोदी रिट्वीट करणार तुमचा फोटो

News Desk

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्णन यांच्या अटकेचे सर्वोच न्यायालयाचे आदेश 

News Desk

“राज्यसभा निवडणुकीत ‘मविआ’चे सर्व उमेदवार विजयी होतील,” नाना पटोलेंचा विश्वास

Aprna