HW News Marathi
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी उद्योगक्षेत्राने कमवा व शिका योजना राबवा

मुंबई | कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्स ( सी एस आर ) निधी या योजने मध्ये उद्योगांनी आपल्या नफ्यातील 2 टक्के रक्कम ही समाज सेवेसाठी वापरावी असा निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए च्या केंद्रसरकार ने दिले आहेत. त्यानुसार कॉर्पोरेट क्षेत्राची आढावा बैठक सह्याद्री गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा , सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या पहिल्याच बैठकीत कॉर्पोरेट क्षेत्रातील 52 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कॉर्पोरेट कंपन्यांनी सी एस आर फंडातून केलेल्या उपक्रमांच्या माहितीचा आढावा घेतल्यानंतर कॉर्पोरेट कंपन्यांनी गरीब मुलांना उच्च शिक्षणासाठी कमवा आणि शिका असा उपक्रम राबवावा असे आवाहन रामदास आठवलेंनी केले.अनुसूचित जाती जमातीच्या प्रगतीसाठी उद्योग क्षेत्राने सी एस आर फंडातून विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन रामदास आठवलेंनी केले.

सीएसआर फंडातून अनुसूचित जाती जमातीच्या बेरोजगारांना स्वयंरोजगार देणे, त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन उद्योजक बनविण्याचे उपक्रम हाती घ्यावेत तसेच अनुसूचित जातीजमाती सोबतच भटक्या विमुक्त आणि ओबीसी मुलांच्याही उत्कर्षासाठी सीएसआर फंडातील रक्कम खर्च करावी . ग्रामीण भागात शाळेच्या सुसज्ज इमारती उभराव्यात असे आवाहन रामदास आठवलेंनी केले. यावेळी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ली., गोदरेज , जिंदाल ,महिंद्रा अँड महिंद्रा , बीपीसीएल आदी एकूण 52 उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडले’, भाई जगताप यांची टीका

News Desk

“माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला,” पोलिस आयुक्तांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

कालव्यांची गळती थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घ्या! – अजित पवार

Aprna
देश / विदेश

कोर्टाच्या आदेशाची सरकारने चुकीची व्याख्या केली | सुप्रीम कोर्ट

swarit

नवी दिल्ली | भाजप सरकारच्या काळात सर्वच ठिकाणी आधार कार्ड महत्वाचे समजले जात आहे. अनेकांना आधार कार्ड नसल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पहायला मिळते. परंतु हल्ली आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्याची सक्ती केली जाते. या प्रकरणावर बुधवारी सुप्रीने कोर्टाने स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळ कोर्टाने सुनावणी करताना मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक करण्याचे आदेश कधीच दिले नव्हते. तर 6 फेब्रुवारी २०१७ रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची सरकारने चुकीची व्याख्या केल्याचे कोर्टाने बुधवारी स्पष्ट केले आहे.

आधार कार्ड तसेच एका संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटल्या प्रमाणे मोबाईलचा वापर करणा-याने देश सुरक्षेच्या दृष्टीने पडताळणी करुन घेणे गरजेचे आहे असे म्हटले होते. परंतु सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचा चुकीचा अर्थ काढत मोबाईल सीम कार्डला आधार लिंक जोडण्याची मोहिम राबवण्यात येत असल्याचे सुप्रीम कोर्टाने या सुनावणीत स्पष्ट केले.

Related posts

पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला, आता या विंचवांच्या नांग्या मोडा!

News Desk

भारतातील सगळ्यात ‘कमी’ वयाच्या मुलाला कोरोनाची लागण

swarit

‘चक दे इंडिया’ म्हणत भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यफेरीत दाखल!

News Desk