HW News Marathi
राजकारण

सेना-भाजप युती, नाणार प्रकल्प प्रश्नांपासून किरीट सोमय्यांचा पळ

मुंबई | अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हावरे प्रोपर्टीज यांच्या वतीने इंटेलिजेंशिया या नवीन प्रॉजेक्टचे भूमिपूजन खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना आणि भाजप युती आणि नाणार प्रकल्प या संदर्भात प्रश्न विचारले असता, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उत्तराची टाळाटाळ करत माध्यम प्रतिनिधींपासून पळ काढला.

हा कार्यक्रम विक्रोळी पूर्व येथील टागोर नगरमधील बिल्डिंग नंबर १८ येथे आयोजित केला होता. यावेळी गेल्या काही दिवसापासून गाजत असलेला कोकणातला नाणार प्रकल्प होणार का ? आणि शिवसेना-भाजपची युती आगामी निवडणुकी आधी होणार का ? या प्रश्नावरुन राजकीय वातावरण तापले आहे. नाणार प्रकल्प हा कोकणात होऊ नये म्हणून स्थानिक रहिवाशी राजकीय नेते मंडळींच्या भेटी गाठी घेत आहेत. त्यामुळे सर्व राजकीय मंडळींचा यांचा या प्रकल्पाला विरोध होत आहे.

तर दुस-या बाजूला २०१९च्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘आम्ही कोणालाही घाबरत नाही, वाघ आणि सिंह दोघेही एकत्र आहोत’ असे अर्थमंत्री सुधीर मुंनगटीवार यांनी विधिमंडळात विरोधकांना उद्देशन सेना-भाजपची युती होणार असल्याचे संकेत दिले होते. मुंनगटीवार यांनी युतीवर चर्चा व्हावी म्हणून बैठकीचे आयोजन केले होते. पण, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीला येणास नकार दिला. या पुन्हा एकदा युतीवर प्रश्न चिन्हा उभे राहिले आहे.

हावरे प्रॉपर्टीज यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार किरीट सोमय्या, शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, डॉ. सुरेश हावरे (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक), अमित सुरेश हावरे (मुख्य कार्यकारी अधिकारी व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक) व अमर सुरेश हावरे (कार्यकारी संचालक व सीएफओ) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर! – सामना

Aprna

वेळ पडली तर रेल्वेने पाणी आणू | महादेव जानकर

News Desk

काँग्रेसची नववी उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील ४ उमेदवारांचा समावेश

News Desk
मुंबई

महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला | मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

मुंबई | महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. महाराष्ट्रात २०१२ मध्ये ५० लाख घरांत शौचालय होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यात २२ लाख शौचालये बांधली. यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र हागाणदारी मुक्त झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अतिथी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याची माहिती दिली आहे. दरम्यान, हागणदारी मुक्तचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

Related posts

प्रभादेवीच्या ब्यूमॉंन्ट इमारतीला आग

News Desk

मुंबई उपनगरामध्ये डायग्नोस्टिक सेंटर्सच्या संख्येत होणार वाढ

swarit

“केळ्याची साल सहा महिन्यांपूर्वी कोणी टाकली?”, घसरत्या GDPवर आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

Aprna