HW News Marathi
देश / विदेश

सरकारने बँकिंग प्रणाली उद्ध्वस्त केली | राहुल गांधी

नवी दिल्ली | कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करत मोदींवर राफेल विमान प्रकरण निरव मोदी बॅंक घोटाळा प्रकरणावर मोदींना टिकेचे लक्ष केले आहे. राहुल गांधींनी अनेक वेळा नीरव मोदी आणि मेहूल चौकसी या दोघांनी परदेशात पळ काढल्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

पीएनबी घोटाळ्या बाबत ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढलेत. सरकारने बँकिंग प्रणाली उद्ध्वस्त केल्याचा आरोप राहुल यांनी केलाय. “नीरव मोदी ३०,००० कोटी रुपये घेऊन फरार झाला, पण मोदींनी यावर एक शब्दही बोलले नाहीत. मात्र आमच्या खिशातून ५००-१००० रुपयांच्या नोटा हिसकावून रांगेत उभे राहण्यास भाग पाडले. मोदींनी ५००- १००० च्या नोटा आमच्या खिशातून काढून नीरव मोदीच्या खिशात टाकल्याचे राहुल यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दहशतवादी सय्यद सलाउद्दीनचा मुलगा एनआयएच्या ताब्यात

swarit

१०७ आमदारांच्या उपस्थितीत झाली बैठक, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे माध्यमांसमोर शक्तिप्रदर्शन

News Desk

शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली न काढण्याची केंद्राची विनंती 

News Desk
राजकारण

अखेर नोटबंदीच्या निर्णयाबाबत अरविंद सुब्रमण्यम यांनी सोडले मौन

News Desk

नवी दिल्ली | नोटबंदीच्या निर्णयाबाबत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी अखेर मौन सोडले आहे. नोटबंदी हा सरकारचा क्रूर निर्णय असून नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावला आहे, अशा शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. ‘ऑफ काउंसिल: द चॅलेंजेस ऑफ द मोदी-जेटली इकॉनॉमी’ या पुस्तकात त्यांनी हा उल्लेख केला आहे.

‘५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यानं भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला होता. त्यामुळं आर्थिक विकासदर आठ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांच्या निचांकीवर पोहोचला. एकाच झटक्यात ८६ टक्के चलन हे कागदाचे तुकडे झाले. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला’, असे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे. अरविंद सुब्रमण्यन हे नोटाबंदीच्या वेळी मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते.

सुब्रमण्यन यांच्या दाव्याचा आधार घेत काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, माजी मुख्य आर्थिक सल्लागारांनी अखेर नोटाबंदीमागील सत्य उघड केले आहे, असे म्हणत विरोधीपक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

Related posts

काँग्रेसला यांची थोडी तरी लाज वाटायला हवी !

News Desk

राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे !

swarit

पुलवामा दहशतवादी हल्ला हा गोध्रा हत्याकांडासारखाच भाजपचा पूर्वनियोजित कट !

News Desk