HW News Marathi
मुंबई

रेल्वेत मराठी तरुणांना नोक-या मनसेमुळेच | राज ठाकरे

मुलुंड | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १५ एप्रिल रोजी मुलुंड येथे सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते १०० महीलांना रिक्षांचे वाटप करण्यात आले. सेना भाजप युती असताना महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही. आम्ही तरुणांना नोक-या देतो असे आश्वासन देत सरकार थापा मारते असा आरोप करत रेल्वेत मराठी तरुणांना नोक-या मनसेमुळेच मिळाल्या असे वक्तव्य राज यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, परप्रांतातून आलेल्या लोकांना इथे नोक-या मिळतात. महाराष्ट्रातल्या तरुणांना प्राधान्याने नोक-या मिळायला हव्यात. २००८ साली मराठी तरुणांना रेल्वेत नोकरी मिळावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले होते. त्यावेळी तात्कालीन केंद्रीय मंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांना निर्णय घ्यावा लागला होता तो आजही एक ऐतिहासिक निर्णय आहे.

ज्या राज्यात रेल्वे साठी नोक-या निर्माण होतील त्यापैकी ५०-६० टक्के नोक-या स्थानिक भूमीपुत्रांना मिळाल्याच पाहिजेत. २००८ सालच्या त्या आंदोलनामुळे अनेक मुले रेल्वे मध्ये नोकरीला लागली. तेव्हापासून ज्या राज्यात रेल्वेच्या परिक्षा होतात त्या तिथल्या स्थानिक भाषेत होतात हे मनसेच्या आंदोलनामुळे साध्य झाले. आम्ही युती सरकार सारख्या धापा मारत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे कामच आहे जे बोलू ते करु असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१०० दिवस उलटले तरी मृतदेह जेजे रुग्णालयात

News Desk

औरंगाबादचा कचरा विधानसभेत पेटला, कामकाज तीन वेळा तहकूब

News Desk

कोस्टल क्लीनअप डे’चा उत्साह, श्रमदानाने युवकांनी केली दादर चौपाटीची स्वच्छता

News Desk