HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या विक्रमी सभांमुळे महाराष्ट्रात तुफान

मुंबई | राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रे दरम्यान काँग्रेस नेत्यांच्या दणदणीत भाषण, संयम व नेतृत्वामुळे सध्या वातावरण ढवळून निघालेच आहे शिवाय राष्ट्रवादीच्या विक्रमी सभांमुळे एक तुफान आल्याचे चित्र गेले १२ दिवस पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळाले.

विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप सरकारवर हल्लाबोल केला त्यानंतर चौथा टप्पा २ ते १२ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात झाला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात मिळाला परंतु विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात झालेल्या सभेने आजपर्यंतचे सर्वांचेच रेकॉर्ड मोडल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेवून पश्चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोलची सुरुवात झाली. कोल्हापूरपासून सुरु झालेल्या हल्लाबोल आंदोलनातील शेवटची सभा पुण्याच्या वडगांवशेरी-खराडी येथे झाली.अजित पवार, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे,जयंत पाटील, दिलीप वळसेपाटील, चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत सरकार आणि सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला.

त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्व सेलचे अध्यक्ष, आमदार यांनीही भाजप-सेनेच्या कारभारावर हल्ला केला. एकंदरीतच राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांसह सर्वच नेत्यांनी हल्लाबोल आंदोलनामध्ये सरकारविरोधात आक्रमकता दाखवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यशासन नेहमीच सकारात्मक !

News Desk

“मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नव्हता” – महापौर किशोरी पेडणेकर

News Desk

अमित शहांनी कितीही ताकद पुरवली तरी शिवसेना नारायण राणेंना धुळ चारल्याशिवाय शांत राहणार नाही…! 

News Desk