HW News Marathi
राजकारण

सभागृहाच्या कामकाजात भाजपचा अडथळा

पुणे | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ महाराष्ट्रासह भारतभरात भाजपनेत्यांसह मोदी समर्थकांनी गुरुवारी उपोषण ठेवले होते. परंतु भाजपच्या आमदारांमुळे हे उपोषण पुण्यात फ्लॉप ठरले आहे. कॉंग्रेस प्रमाणे भाजपच्या उपोषणाचा फज्जा उडाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजपच्या उपोषणावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

भाजपचे उपोषण म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज’ अशा शब्दात शेट्टी यांनी भाजपवर टिका केली आहे. देहू येथे पार पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणी नंतर पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपण लोकसभेत प्रायव्हेट बिल मांडणार असून देशातील सर्व विरोधी पक्षांना पाठिंबा देण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना केले. सध्याच्या सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून लोकसभेच्या सभापतींनी सांगावे आतापर्यंत गटनेत्यांची कीती वेळा बैठक बोलावली किंवा हा तिढा सुटावा म्हणून सर्वांची बैठक घेतली. उलट सरकार काही लोकांना हाताशी धरून सभागृहाचे कामकाज चालू देत नसल्याचा आरोप खासदार शेट्टी यांनी यावेळी बोलताना केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आजपासून शरद पवार ३ दिवसांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर

Gauri Tilekar

भाजपच्या राज्य कार्यकारिणीकडून एकनाथ खडसेंना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी

News Desk

जयकुमार रावलच्या पदाचा राजीनाम्याची मागणी – नबाव मलिक

News Desk
राजकारण

सत्ता नसल्यामुळे सध्या पाण्याविना मासे अशी तुमची अवस्था

News Desk

मुंबई | ‘सत्ता नसल्यामुळे सध्या पाण्याविना मासे अशी तुमची अवस्था झाली आहे. तुमच्या काळात दलितांवर जास्त अन्याय झाले. परंतु सध्या तुम्ही दलितांचे कैवारी झाल्याचा आव आणत आहात.’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच पुढे ओबीसी आयोगाला बहुमत नसल्याने तुम्ही हे बील नाकारले.

ग्रामीण भागात लोकांचे ३१ कोटी लोकांनी बँकेत खाते उघडले. मात्र तुमच्या काळात ५० टक्के लोकांनी तुम्ही त्यापासून वंचित ठेवले, परंतु हे काम मोदींनी केले. मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशात बदल होत आहे म्हणून तुम्ही संसदेत काम होऊ देत नाही. मुंबईतील विलेपार्ले येथे उपोषणासाठी उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

 

 

 

Related posts

यापुढे युती नाही | उद्धव ठाकरे

News Desk

ते पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत यासाठी प्रयत्न करेन पण तिरस्कार करणार नाही !

News Desk

तेजबहादूर यादव यांची वाराणसीची उमेदवारी रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव

News Desk